ताराराणी पक्ष कार्यालयात इचलकरंजी येथे शहरातील वस्त्रोद्योग, संजय गांधी निराधार अनुदान योजना, अन्नधान्य पुरवठा, आयजीएमसह नगरपालिकेशी संबंधित विविध प्रलंबित कामांसह आवश्यक विषयांवर बैठक पार पडली. याबैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे विविध प्रश्न, अनुदानापासून वंचित लाभार्थी, अन्नधान्य पुरवठ्यातील सावळा गोंधळ, शहराला भेडसावणारी पाणीटंचाई, पूरग्रस्तांच्या व्यथा यासह वस्त्रोद्योगाला नवसंजिवनी मिळण्यासाठी आवश्यक व ठोस उपाययोजना याबाबत ऊहापोह करण्यात आला. या सर्वच प्रश्नासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सर्व माहिती जाणून घेऊन आपण दिल्या शब्दाप्रमाणे मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहोत. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील प्रश्नांबाबत लवकरच प्रशासकीय अधिकारी तसेच नगरपालिकेशी संबंधित विभागातील अधिकार्यांची बैठक घेऊन प्रलंबित कामांना गती देऊ, असे सांगितले.