इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील जयभीम नगर झोपडपट्टीतील प्रलंबित १०८ घरांसाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी मुंबई, मंत्रालय येथे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. तसेच शहापूर परिसरातील म्हाडा कॉलनीतील रिक्त ३ घरांची मागणी केलेल्या अर्जदारांना प्राधान्यक्रमाने देण्याबाबत संबंधिताना आदेश द्यावेत व हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली. यावेळी जयभीम नगर झोपडपट्टीतील प्रलंबित १०८ घरांसाठीयांनी सदर प्रश्नी मिटिंग घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.