#कोल्हापूर जिल्ह्यातील #महापूराच्या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षेनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी कोल्हापूर पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांची भेट घेऊन #इचलकरंजी पूरपरिस्थितीबाबत माहिती दिली, तसेच विविध विषयावर चर्चा केली. इचलकरंजी शहर व परिसरातील नदीकाठचे अनेक नागरीक जीव वाचविण्यासाठी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. या नागरीकांना तातडीची #मदत म्हणून प्रती व्यक्ती रू.२ हजार देणेत द्यावेत. तसेच प्रती कुटूंब २५ किलो गहू व २५ किलो तांदूळ मोफत देणेत यावेत. सर्व नुकसानग्रस्त #शेतकरी, नागरीकांचे तातडीने #पंचनामे करावेत. पूरामुळे होणाऱ्या छोट्या उद्योगांच्या नुकसानीपोटी त्या उद्योगांच्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा #उद्योग केंद्राकडून करून त्यांना तातडीची मदत म्हणून रू. ५० हजार द्यावेत. यासह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी, नागरीक व छोट्या उद्योजकांची #कर्जमाफी करावी,तसेच त्यांच्या कृषीपंपाची, #घरगुती वीजेची व उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या वीजेची बिले पूर्णपणे माफ करावीत,पूरग्रस्त भागातील खराब मीटर #महावितरण तर्फे तात्काळ मोफत बदलून द्यावेत.पूर्णपणे पडलेल्या घरांसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचे रू.२ लाख ७३ हजार व राज्य शासनाचे रू.२ लाख ७३ हजार एकत्रित #अनुदान देऊन त्यांना घर बांधणीसाठी सहकार्य करावे. अंशतः पडलेल्या घरांसाठी पडझडीमुळे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीचे प्रमाणात शासनाने मदत करावी. तात्पुरत्या निवाऱ्याकरिता शहरी भागासाठी रू. ३६ हजार व ग्रामीण भागासाठी रू.२४ हजार इतकी .एकरकमी मदत शासनाकडून करावी. २७ एच. पी. वरील यंत्रमागांसाठी वीज दरात प्रती युनिट अतिरिक्त ७५ पैशांची अतिरीक्त सवलत देण्याबाबत जाहीर केले होते. याची अंमलबजावणी करावी व २७ एच. पी. खालील यंत्रमागांसाठी प्रचलित वीज दरामध्ये प्रती युनिट १ रूपयाची सवलत द्यावी. #यंत्रमाग उद्योजकांना ५ टक्के व्याज अनुदान जाहीर केले होते. ते अनुदान मिळणेबाबतचे जवळपास २,५०० प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रस्तावांना त्यावेळच्या शासन निर्णयाप्रमाणे त्वरीत अनुदान देणेत यावे.पूरग्रस्त लघु उद्योजकांचे ३ महिन्यांचे वीज बिल माफ करणेत यावे. अशा सर्व मागण्यासोबत उद्योगाशी निगडीत सर्व घटकांना दिलासा देणेबाबत आपण जरूर ते प्रयत्न करावेत, असे निवेदन विरोधी पक्षनेते मा. Devendra Fadnavis यांच्याकडे दिले.